Share

“हे राज्य नेमके कोणते मुख्यमंत्री चालवतात?”, आ. अतुल भातखळकरांचा सवाल

Published On: 

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवारपासून शाळा सुरू होत असल्याचा निर्णय जाहीर केला. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी वेगवेगळे वक्तव्य केले आहेत. त्यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे.

याबाबत आमदार अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले, ‘शाळा आजपासून पुन्हा सुरू होत आहेत. एखाद्या विद्यार्थ्याला करोनाची लागण झाल्यास केवळ शेजारच्या मुलांचे विलगीकरण करावे, असे शिक्षण खाते म्हणते तर करोनाबाधित आढळल्यास संपूर्ण वर्ग बंद करावा, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात. हे राज्य नेमके कोणते मुख्यमंत्री चालवतात?’, असा सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

राज्यात पुन्हा कोरोनाचा कहर वाढल्याने सुरू झालेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे काही खबरदारी घेऊन शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत हालचाली सुरू केल्या गेल्या आहेत. याबाबत वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल तिथं २४ जानेवारी पासून शाळा सुरु होतील. शाळा सुरु करण्याबाबत स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार असतील ते राज्य सरकारनं दिलेल्या नियमावलीचं पालन करुन निर्णय घेतील. असे वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!