मुंबई : महाराष्ट्रातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून वाचाळ अभिनेत्री कंगना राणावत हिच्या भोवती फिरताना दिसत आहे. कंगनाने आधी मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला नंतर मुंबईची तुलना पाकव्यप्त काश्मीरशी केली आणि या सगळ्यांना भाजपने उघड पाठींबा दिला त्यामुळे कंगना ही अभिनेत्री आहे कि भाजपची प्रवक्ता असेही प्रश्न विचारले जाऊ लागले होते. अशात शिवसेना आणि कंगना राणावत यांच्यातील वाद शिगेला पोहचले असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून शिवसेनेला डिवचले आहे.
मात्र, यावर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. कंगनाला राजकारणात येण्याचा कल नाही. हे प्रकरण या सरकारने वाढविले. कंगना काही राष्ट्रीय नेत्या तर नाहीत. यांनीच तसे बनविले. सरकारने त्रस्त करणे आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केवळ त्यांचीच चर्चा करावी, हे योग्य आहे काय? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.
तर, आज एक महिला पूर्ण सरकारला पराजित करीत आहे. काय प्रतिमा राहिली सरकारची ? दुर्दशा झाली. राजासारखी मानसिकता सोडायला हवी. लोकशाहीत कोणी राजा असत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. असा घणाघात देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- सुधारित कृषी विधेयकाची होळी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नोंदवला निषेध
- विराट कोहलीला डब्बल दणका मॅचही हरली आणि…
- धक्कादायक : पुणे संकटात असताना महापौर बंगल्यावर रंगली सर्वपक्षीय नेत्यांची जंगी पार्टी ?
- महापालिका हद्दीतून जाणाऱ्या कल्याण-विशाखापट्टणम रस्त्यासाठी आ.जगताप यांचे पवार यांना साकडे
- हिंगोलीमध्ये खाजगी कोरोना रुग्णालयाच्या उभारणीला नागरिकांचाच विरोध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

