Share

‘इंस्टॉलमेंट दौऱ्यापेक्षा एकाच दिवशी सर्व आटोपायचं, पैसे वाचले असते’, भाजपचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातारा येथील पाटण दौऱ्यावर आले होते. मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा पावसाने आगमन केले.त्यामुळे हवामान खराब असल्याने येथील दृश्यमान कमी झाल्याने हेलीकॉप्टर लँडिग रद्द करण्यात आले.आणि मुख्यमंत्री परत पुण्याकडे रवाना झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला. आता यावरूनच भाजप प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाना साधला आहे.

महाड, चिपळूण, सातारा मुख्यमंत्री रोज एक दौरा करत आहेत. मात्र चारच्या आत घरी जाणारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी एकप्रकारे इंस्टॉलमेंटवर आधारितच दौरे केले आहेत. त्यामुळे अशा दौऱ्यापेक्षा एकाच दिवशी सर्व दौरे आटोपून सरकारी पैसे वाचवता आले नसते का, असा सवाल करत मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाड, चिपळूण या ठिकाणी दौरा करत या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या भागातील पूरग्रस्तांना नुकसान भरपाईचे आश्वासन त्यांनी दिले आहे. २६ जुलैरोजी ते पाटण येथील नागरिकांशी संवाद साधणार होते. मात्र लँडिग न करताच त्यांनी पुण्याकडे आपला ताफा फिरवला. त्यामुळे भाजपच्या अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!