Share

‘गेले दीड वर्ष मंत्रालयात पाऊल न ठेवलेल्या मुख्यमंत्र्यांनाही वेतन आणि भत्ते मिळता कामा नये’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरुच आहे. या कर्मचाऱ्यांच्या संपाने आता वेगळं वळण घेतलं असून हे आंदोलन आणखी चिघळलं जात आहे. त्यातच अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. एसटी कर्मचारी संप मागे घेत नसल्याने ‘ना काम, ना दाम’ यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी दिला आहे. यावरुन भाजपने राज्य सरकारवर टीका करण्याची एक संधी सोडली नाही. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा टीका केली आहे.

अनिल परब यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आता ‘या न्यायाने गेले दीड वर्ष मंत्रालयात पाऊल न ठेवलेल्या मुख्यमंत्र्यांना देखील वेतन आणि भत्ते मिळता कामा नयेत… ना काम ना दाम…’, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत. याबाबत अतुल भातखळकरांनी ट्वीट केलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर बनू लागला आहे. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेले असताना दुसरीकडे राज्य सरकारकडून 350 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच, राज्य सरकारने त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!