मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा प्रश्न आता गंभीर बनू लागला आहे. न्यायालयाने आंदोलक कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे निर्देश दिलेले असताना दुसरीकडे राज्य सरकारकडून ३५० कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच, राज्य सरकारने त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल केली आहे.
याच पार्श्वभूमीवर आज(११ नोव्हें.)भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक सूचक ट्विट केले असून त्यामध्ये ‘जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही’, असे ते म्हणाले आहेत. तसेच काल रात्री एसटी कर्मचाऱ्यांसमवेत जेवण करुन आझाद मैदानावरच मुक्काम केला असल्याचीही माहिती यावेळी पडळकरांनी दिली. या ट्विट सोबतच #लढा_विलिनीकरणाचा या हॅशटॅगचा वापर त्यांनी केला आहे.
जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही.
काल रात्री #एसटी कर्मचाऱ्यांसोबत जेवण करुन आझाद मैदानावरच मुक्काम केला.#लढा_विलिनीकरणाचा pic.twitter.com/npwVrHqGec— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) November 11, 2021
दरम्यान, काल भाजपच्या नेत्यांनी एसटी कामगारांच्या प्रश्नासाठी मंत्रालयावर मोर्चा काढला. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी अटक केली. त्यावेळी मोर्चासाठी मंत्रालयाकडे जात असताना गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. त्यांना मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- शेवटी ज्याचं जळतं त्यालाच कळतं; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन चंद्रकांत पाटलांचा टोला
- नवाब मलिक स्वत:ची कबर स्वत:च खोदत आहेत; चंद्रकांत पाटलांचा इशारा
- जेवढे कर्मचारी दाबाल तेवढे उसळून उठतील- प्रविण दरेकर
- राज्याच्या हिताच्या दृष्टीने एकदा विचार करा; संजय राऊतांचं कर्मचाऱ्यांना आवाहन
- कर्मचाऱ्यांना आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका’


