🕒 1 min read
मुंबई : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज (१० मार्च) जाहीर होणार असून यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश आहे. तसेच संपूर्ण देशाचे या निकालांकडे लक्ष लागले असून सकाळी ८ वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, युपीत भाजपला बहुमत मिळाले असून कलांनुसार भाजप २७४ जागांनी आघाडीवर आहे. तर त्या खालोखाल सपाला १२० जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे युपीत पुन्हा एकदा भगव्याचंच राज्य येणार असल्याचे निकाल हाती येत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की,‘सर्व मतदारांना धन्यवाद. विजयाचा आनंद आहे पण त्यापेक्षा जास्त आनंद आहे तो जनतेची सेवा करण्याची संधी मतरुपी आशीर्वाद देऊन जनतेनी भाजपला प्राप्त करून दिली त्याचा. आम्ही अमृत महात्सव वर्षांमध्ये आहोत, अपेक्षा हीच आहे की स्वातंत्र्यानंतर लाखो शहिदांनी प्राणाची आहुती देत भारत मातेच्या चरणी स्वातंत्र्याचा मंगलकलश अर्पण केला. तरीही गोरगरिबांचे स्वप्न पूर्ण होत नव्हतं.’
दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या नेतृत्वामध्ये आपला देश हा बहिश्विक नेतृत्व करायला निघाला आहे. आणि दुसरीकडे सर्व सामान्यांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने या अमृत महोत्सवाच्या वर्षात जे घराणेशाही, जातीयवाद, आहे याला मतदारांनी झटका दिला आणि चार खाणे चीत केलं याचा मला अभिमान आहे. तसेच आम्ही फक्त शाब्दिक टीका केली नाही त्यामुळे हा विजय झाल्याचेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
-
नवज्योत सिंह सिद्धूंची काँग्रेसच्या पराभवावर प्रतिक्रिया; म्हणाले…
-
“बुलडोझरसमोर काहीही येऊ शकत नाही, ते सायकल असो किंवा…”, युपीच्या यशावर हेमा मालिनींची प्रतिक्रिया
-
झुलन गोस्वामीने रचला इतिहास, विश्वचषकात असा कारनामा करणारी ठरली पहिली गोलंदाज
-
“शिवसेना जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त…”- रावसाहेब दानवेंचा टोला
-
आलियाची सावत्र बहीण पूजा भट्ट काय म्हणाली ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाबद्दल …
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
