नवी दिल्ली: देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीचा आज फैसला होणार आहे. उत्तर प्रदेश या मोठ्या राज्यासह पंजाब (Punjab), गोवा (Goa), उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा फैसला काही तासातच होणार आहे. मात्र त्यापूर्वीच काही ठिकाणी आनंद साजरा करताना दिसून आले. उमेदवारांमध्ये आज प्रचंड उत्साह दिसून येत आहे.
दरम्यान उत्तर प्रदेशात 403 जागांसाठी सात टप्प्यांत निवडणूक पार पडली. पहिल्या टप्प्यात येथे 62.43 टक्के मतदान झाले. तर सातव्या टप्प्यात 46.40 टक्के मतदान झाले. तर मणिपूरमध्ये विधानसभेच्या 60 जागांसाठी मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यात 78.03 टक्के मतदान झाले. तर दुसऱ्या टप्प्यात 78.49 टक्के मतदान झालं.
दरम्यान गोव्यात विधानसभेच्या 40 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. यात 75.29 टक्के लोकांनी मतदान केले. तसेच पंजाबमध्येही 117 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. पंजाबमध्ये 65.32 टक्के मतदान झाले होते. तर उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात 70 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये 59.37 टक्के मतदान झाले आहे. आता या पाचही राज्यांचा निकाल थोड्यावेळात कळणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून काही क्षणांतच निकाल कळेल.
महत्वाच्या बातम्या:
“खेळ करण्यापेक्षा या महाकत्तलखान्याचे रचयिता कोण…”, आशिष शेलारांचा घणाघात
रस्त्यावर फुगे विकणारी मुलगी बनली मॉडेल..! ‘हा’ फोटो सोशल मीडियावर होतोय प्रचंड व्हायरल
‘आमच्याकडे आमदार खासदार नसले तरी निर्माते आहेत’ – बाळा नांदगावकर
कोरियन मुली एवढा सुंदर का दिसतात? चला तर जाणून घेऊयात त्यांच्या ब्युटी टिप्स..!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

