मुंबई : भारतीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानपरिषद स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यातील एकूण ८ जागांचा कार्यकाळ संपुष्ठा आला असून त्यातील ६ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. १० डिसेंबर रोजी मतमोजणी आणि १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
राज्यातील मुंबईतील २, कोल्हापूर, धुळे, नंदुरबार, अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर या ६ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. तर सोलापूर आणि अहमदनगर येथील दोन जागांसाठी निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसून लवकरच होण्याची शक्यता आहे. रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरिश पटेल, गिरीश व्यास, गोपालकिशन बाजोरिया यांच्या जागांवर ही निवडणूक होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
याबाबत निवडणूक आयोगाकडून १६ नोव्हेंबर रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. २३ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे. १४ डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर केला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘हितसंबंध दुखावलेल्या काही पापण्या सोडल्या तर सगळं जग मोदींचे कौतुक करतंय’
- १०० कोटी लसीकरणानंतर पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’
- पुन्हा सत्तेत येणार नाही, या भीतीपोटी पटोलेंनी ‘ते’ वक्तव्य केले-संजय कुटे
- बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

