🕒 1 min read
मुंबई: देशात १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार पडला आहे. लसीकरणाचा हा ऐतिहासिक विक्रम भारताने केला आहे. या निमित्तानेच जगभरातून भारताचे कौतुक केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मोदींचे कौतुक करत विरोधी पक्षावर निशाना साधला आहे.
हितसंबंध दुखावलेल्या काही पापण्या सोडल्या तर सगळं जग पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करते आहे. लस निर्माते, संशोधक आणि सर्वच. असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे. दरम्यान १०० कोटींचा हा विक्रम या अगोदर चीनने केला आहे. आता हा विक्रम भारताने करत मोठा विक्रम केला आहे.
हितसंबंध दुखावलेल्या काही पापण्या सोडल्या तर सगळं जग पंतप्रधान @narendramodi चे कौतुक करते आहे. लस निर्माते, संशोधक…सर्वच https://t.co/lGJQ8ZBBnQ
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) October 23, 2021
दरम्यान भारताने १०० कोटी लसीकरण करत ऐतिहासिक विक्रम केला आहे. यावरून जगभरात देशाचे कौतुक केले गेले. मात्र अशात आता कॉंग्रेसने एक मागणी मोदी सरकारकडे केली आहे. १०० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे अभिनंदन केले असले तरी कोरोनामुळे जीव गमावलेल्या ४.५३ लाख लोकांच्या कुटुंबीयांना माफीनामा लिहून द्या. अशी मागणी काँग्रेस नेते प्रहार वल्लभ यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राजकीय नेत्यांनी तपास यंत्रणेवर शंका उपस्थित केली तर कायदा व्यवस्थेला धोका आहे’
- ‘जीआरमध्ये ‘संभाजीनगर’ नाव आलंय, लवकरच घोषणाही होईल’, संजय राऊतांचा दावा
- ‘पीटलाईन जालन्याला हलवून औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळू नका.. ‘आ. सतिश चव्हाणांचा रावसाहेब दानवेंना टोला!
- बाबरी तोडली तेव्हा आम्ही काखा वर नाही केल्या, तुमच्यासारखं पळून नाही गेलो; राऊतांचा भाजपला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
