मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. “एक महिना झाला तरी दोघांचंच कॅबिनेट बेकायदेशीरित्या सगळे निर्णय घेत आहे. मंत्रिमंडळ अजूनही स्थापन झालेले नाही. त्यामुळे शिवसेनेतून बाहेर पडून नक्की काय मिळवलं याचं आत्मचिंतन करावं लागेल. तसेच सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर १६ आमदार अपात्र ठरतील. दुसऱ्या पक्षात जाण्याची अनेक आमदारांची तयारी नाही. काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पुन्हा सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”, असे राऊत म्हणाले होते. त्यावरून आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत यांच्याबद्दल विचारले असता शिंदे यांनी चांगलाच खोचक टोला लगावला आहे. शिंदे म्हणाले कि, “राज्यात सध्या 166 आमदारांचं सरकार आहे. तसेच 12 आमदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील दिलेले आहे. महाराष्ट्रातील सरकार पूर्णपणे मजबूत आहे. ते स्वप्न पाहत असतात आणि त्यांना स्वप्न पाहतच राहू द्या.” दरम्यान एकनाथ शिंदे हे आज शिवसेनेचे जेष्ठ नेते लिलाधर डाके यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी गेले होते. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संपर्क साधला.
एकीकडे शिवसेनेशी बंडखोरी करून राज्यात सत्ता स्थापन करणारे मुख्यमंत्री सध्या शिवसेनेच्याच जेष्ठ, अनुभवी नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही दिवसात शिंदे हे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचीही भेट घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या भेटींमागे नक्की काय कारण आहे? हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | महाराष्ट्राच्या राजकारणात ३ महिन्यापासून खेळ खंडोबा सुरू – संजय राऊत
- Amit Shah and Eknath Shinde : महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय अमित शाह घेणार?
- Sanjay Raut | “महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्ता परिवर्तन होईल” ; संजय राऊतांचे मोठे विधान
- Amol Mitkari | शिंदे गटाला भाजपमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही – अमोल मिटकरी
- Sanjay Raut : पुन्हा सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

