Sanjay Raut। मुंबई : काल शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यानंतर पुढे आता हा मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यांमध्ये मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल राज्याचे मुख्यमंत्री दिल्ली वारीवर येणार होते. स्वारीवर नाही.गेल्या महिन्याभरातली त्यांची ही ५वी दिल्ली भेट आहे, असा टोला राऊतांनी लगावला.
पत्रकार परिषदेत बोलताना राज्यात पुन्हा सत्ता परिवर्तन होऊ शकतं. पुन्हा सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटायला नको असे मोठे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. महाराष्ट्रातले मुख्यमंत्री हे वर्षातून ४ वेळा ही दिल्लीला आले नाही आहेत. आणि सध्या च्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीला महिन्यातून ५ वेळा यायला लागत आहे. महाराष्ट्राच्या मनामध्ये खूप गोंधळ आहे, असाही ते म्हणाले.
शिवसेनेचे मुख्यमंत्री जर कोण म्हणून घेत असतील तर शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला कधी दिल्लीत यावे लागले नाही. शिवसेनेचे हाय कमांड हे कायम मुंबई मध्येच राहिल्या. दिल्लीचे लोक मुंबईत येऊन शिवसेनेशी चर्चा करत होते. मंत्री मंडळाची स्थापना अद्याप होऊ शकली नाही.एक महिना झाला तरी दोघांचेच कॅबिनेट आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ३ महिन्या पासून खेळ खंडोबा सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Aurangabad : भाजपा शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारीत; औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटासोबत युती!
- Amol Mitkari | महाराष्ट्रात लवकरच ‘महाभारत’ होणार – अमोल मिटकरी
- Mahesh Tapase | सरकार स्थापन करुन महिना झाला तरी मंत्रीमंडळ नाही हे दुर्दैव – महेश तपासे
- Sanjay Raut | “प्रामाणिकपणासाठी मी त्याचं कौतुक करतो”; संजय राऊतांनी उधळली खोतकरांवर स्तुतीसुमने
- Ajit Pawar : “मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊ नये, पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करावी”; अजित पवारांचा सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

