मुंबई : महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होऊन बराच काळ लोटला असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार केलेला नाही. बुधवारी ते चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाणार होते, तिथे ते भाजपच्या हायकमांडला भेटणार होते. मात्र शेवटच्या क्षणी त्यांचा दौरा रद्द झाला. यामागचे कारण त्यांनी दिलेले नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराला ऑगस्ट महिना उजाडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (शिवसेना) शिवसेनेने शिंदे सरकारला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारचे भवितव्य अंधारात आहे. या सर्व गोंधळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमोल मिटकरी म्हणाले, “शिंदे गटाला भाजपमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही, असेच साधारण सर्व घडामोडींवरून चित्र निर्माण झाले आहे. राज्यपालाच्या भेटीनंतर फडणवीसांचा दिल्ली दौरा अचानक रद्द होणे आणि शिंदे साहेब एकटेच दिल्लीला जाणे? महाराष्ट्रात लवकरच महाभारत होणार”
शिंदे गटाला भाजपमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही असेच साधारण सर्व घडामोडींवरून चित्र निर्माण झाले आहे .राज्यपालाच्या भेटीनंतर फडणवीसांचा दिल्लीदौरा अचानक रद्द होणे आणि शिंदे साहेब एकटेच दिल्लीला जाणे ? महाराष्ट्रात लवकरच महाभारत.@TV9Marathi @abpmajhatv @saamTVnews
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 27, 2022
येत्या तीन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी नुकतेच सांगितले होते, मात्र दिल्ली दौरा पुढे ढकलण्यात आल्यानंतर सट्टा बाजार पुन्हा तापला आहे. शिंदे गट आणि भाजप यांच्या समीकरणाचीही लोक आता चर्चा करू लागले आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकवेळा दिल्लीला गेले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. तसेच त्यांचा शपथविधी सोहळा होऊन बरेच दिवस झाले आहेत. ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर प्रत्येक वेळी शिंदे आणि फडणवीस लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करणार असल्याचे बोलले जात असले तरी अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.
दरम्यान, राज्य सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार न केल्याने विरोधकांनीही टीका केली आहे. मुसळधार पावसाने विदर्भ-मराठवाड्यातील शेतीचे नुकसान झाले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे एकाही जिल्ह्यात पालकमंत्री नाही. त्याचबरोबर सरकारकडून मदत मिळत नसल्याची टीकाही विरोधकांनी केली आहे. तसेच राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशनही अद्याप झालेले नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Aurangabad : भाजपा शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारीत; औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटासोबत युती!
- Amol Mitkari | महाराष्ट्रात लवकरच ‘महाभारत’ होणार – अमोल मिटकरी
- Mahesh Tapase | सरकार स्थापन करुन महिना झाला तरी मंत्रीमंडळ नाही हे दुर्दैव – महेश तपासे
- Sanjay Raut | “प्रामाणिकपणासाठी मी त्याचं कौतुक करतो”; संजय राऊतांनी उधळली खोतकरांवर स्तुतीसुमने
- Ajit Pawar : “मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय घेऊ नये, पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करावी”; अजित पवारांचा सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

