जळगाव : एकेकाळचे भाजपचे दिग्गज नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ खडसेंनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप करत खडसेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला असून खडसेंनी आता भाजपच्या नेत्यांवरच प्रहार करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, एकनाथ खडसेंच एक वादग्रस्त कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होत आहे. वडगाव बुद्रुक तालुका जामनेर मधील एका व्यक्तीने गावातील गंभीर पाणी प्रश्नासंदर्भात खडसेंना मदतीसाठी फोन केला होता. यावेळी, खडसेंनी या व्यक्तीला गावाचे व तालुक्याचे नाव विचारले असता ‘पाणी नाही, तर तुझा आमदार कुठे मेला?’ असा सवाल या ग्रामस्थाला केला. यावर त्याने ते फोन उचलत नाहीत असं प्रत्युत्तर दिलं. यावर, ‘पोरीचा फोन उचलतो तो फक्त’ असं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलं आहे.
पुढे त्यांनी या ग्रामस्थाची तक्रार एकूण गावातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठीचे आश्वासन देखील दिले. मात्र, जामनेर मतदारससंघाचे आमदार भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन हे असून त्यांच्याबद्दल खडसेंनी केलेल्या या विधानामुळे खळबळ उडाली आहे. याआधी देखील महाजन आणि खडसेंमधील वाद अनेकदा उफाळून आल्याचं समोर आलं होतं. आता खडसेंच्या या विधानामुळे पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये ठिणगी पडली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारच ठरलं ! अखेर राज्यात १८ ते ४४ वयोगटासाठी सरसकट मोफत लसीकरण
- ‘गोकुळ’साठी राजू शेट्टींच ठरलं; निवडणुकीत ‘या’ गटाला जाहीर केला पाठींबा
- रश्मी शुक्लांनी CBI चौकशीत दोन ‘अनिल’ आणि बड्या नेत्याचं नाव घेतलं; भाजप नेत्याचा दावा
- ‘चव्हाणसाहेब, महाराष्ट्र निष्क्रिय सरकार आणि तक्रारखोर नेतृत्वाची किंमत मोजतोय त्यावर आधी बोला’
- ‘लाख नव्हे कोटी रुपयांचा खेळाडू बनुन दाखव’ …अन् दिल्लीच्या ‘या’ खेळाडूने द्रविडचे शब्द खरे केले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

