मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. यामुळे आरोग्य सेवेवर प्रचंड ताण निर्माण होत असून रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं जी गंभीर परिस्थिती निर्माण झालीये त्यास केंद्र सरकारचं जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास ऑक्सिजन तुटवड्याला कारणीभूत असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. देशात ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यास पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे चव्हाण म्हणाले आहेत.
चव्हाणसाहेब, आपण महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रीय आणि तक्रारखोर नेतृत्वाची किंमत मोजत आहोत, त्याबद्दल आधी बोला. कोरोनाची दुसरी लाट सुनामीसारखी येईल असे स्वतःच नोव्हेंबर महिन्यात सांगून पाच महिने काहीही तयारी न करणाऱ्या तुमच्या मुख्यमंत्र्यांबद्दल आधी बोला. https://t.co/iPH9wohsyj
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 28, 2021
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या आरोपांना भाजपने देखील चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘चव्हाणसाहेब, आपण महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रीय आणि तक्रारखोर नेतृत्वाची किंमत मोजत आहोत, त्याबद्दल आधी बोला. कोरोनाची दुसरी लाट सुनामीसारखी येईल असे स्वतःच नोव्हेंबर महिन्यात सांगून पाच महिने काहीही तयारी न करणाऱ्या तुमच्या मुख्यमंत्र्यांबद्दल आधी बोला.’ असं आव्हान महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारच ठरलं ! अखेर राज्यात १८ ते ४४ वयोगटासाठी सरसकट मोफत लसीकरण
- ‘गोकुळ’साठी राजू शेट्टींच ठरलं; निवडणुकीत ‘या’ गटाला जाहीर केला पाठींबा
- रश्मी शुक्लांनी CBI चौकशीत दोन ‘अनिल’ आणि बड्या नेत्याचं नाव घेतलं; भाजप नेत्याचा दावा
- १९९४ स्फोटक प्रकरणातील आरोपी २६ वर्षानंतर जेरबंद
- ‘एक कोटी देतो, रेमडेसिविर द्या…रुग्णांचे जीव तरी वाचतील’; शिवसेना आमदाराचा संताप


