Share

‘नाथाभाऊ मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होत आहेत म्हणून….’

Published On: 

मुंबई: उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा बँकेच्या १० जागांची मतमोजणी सुरू आहे. राजकीय दृष्ट्या जळगाव जिल्हा बँक महत्वाची मानली जाते. राज्यभरात सर्वत्र निवडणुकांचे वातावरण सुरू आहे. सर्वच पक्ष आपापल्या परीने मोर्चेबांधणी करत आहेत. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारनेच बाजी मारल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी आनंद व्यक्त करत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

आधी भाजपचे नेते असलेले एकनाथ खडसे आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात गेले आहेत. एकनाथ खडसे भाजपवर टीका करताना म्हणाले, गेली ४० वर्षे मी भाजप रुजवण्याचा प्रयत्न केला. मात्र ४० वर्षे माझी अवहेलनाच केली गेली, असा आरोप देखील त्यांनी भाजपवर केला आहे. गेल्या ६ वर्षांपूर्वी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक क वर्गात होती. आती ती अ वर्गात आली आहे. बँकेचा संचित तोटा आम्ही कमी केला. शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याचा प्रयत्न केला. त्याचे फलित या निवडणुकीचा निकाल आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

पक्षात नाथाभाऊ मोठे होत आहेत. मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होत आहेत, म्हणून काही नेत्यांनी महाजनांना मोठं केलं, अशा शब्दात खडसे यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. गिरीश महाजन यांना निवडणूक लढवण्याची हिंमत नव्हती म्हणून त्यांनी पळ काढला. अपयश येणार याची जाणीव त्यांना झाली होती. या निवडणुकीने जळगाव जिल्ह्यात नाथाभाऊची ताकद किती आहे हे दाखवून दिल्याचं खडसे यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातमी:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!