Share

अतिवृष्टीमुळे मृत झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना ९ लाख रुपयांची मदत देण्यासाठी प्रयत्न : अजित पवार

Published On: 

सातारा : पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त गावातील नागरिकांच्या पुनर्वसनाबरोबच शेती, व्यापार आणि कौटुंबिक साहित्याच्या नुकसानीबाबत आढावा घेऊन पूरग्रस्तांना मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी दिले आहे. त्यांनी आज पूरग्रस्त शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर शहराला देखील भेट देऊन सद्यस्थितीची पाहणी केली. यासोबतच त्यांनी सातारा जिल्ह्याचा देखील दौरा केला.

राज्यात पूर, भूस्खलन आदी आपत्तीमुळे शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. साताऱ्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी मृत झालेल्या कुटुंबियांच्या वारसांना अधिकाधिक मदत देण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटलं आहे. अतिवृष्टीत भूस्खलनामुळे अनेक गावांवर संकट कोसळले असून हा धोका कशामुळे निर्माण झाला याबाबतची माहिती तज्ज्ञांकडून घेण्यात येईल. तसेच नैसर्गिक संकटाला प्राधान्य देऊन राज्यातील ९ जिल्ह्यातील धोकादायक गावांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे, असं पवार यांनी सांगितलं.

यासोबतच, ‘अतिवृष्टीत मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख आणि केंद्राच्या माध्यमातून दोन लाख, त्याच प्रमाणे शेतकरी असल्यास गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून दोन लाख असे एकूण मिळून नऊ लाख रुपये देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे,’ अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!