मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा तर रद्द करण्यात आल्या आहेत. यात आता शिष्यवृत्ती परीक्षांचाही समावेश करण्यात आला आहे. आगामी २३ मे रोजी होणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
या संदर्भात वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केलीय. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हिताच्या दृष्टीने २३मे २०२१ रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणारी पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इ.५वी)व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इ.८वी)तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे.परीक्षेची पुढील तारीख योग्यवेळी कळविण्यात येईल.’
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हिताच्या दृष्टीने २३मे २०२१ रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी होणारी पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इ.५वी)व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(इ.८वी)तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे.परीक्षेची पुढील तारीख योग्यवेळी कळविण्यात येईल. pic.twitter.com/maaDpyJgFm
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) May 10, 2021
राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यातच दुसरी लाट सुरू असताना तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना जास्त धोका असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या वतीने घेतलेला हा निर्णय योग्यच आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आता ‘या’ मोठ्या शहरात १२ मे पासून पूर्ण लॉकडाऊन !
- ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकरना टोल माफी, केंद्राचा निर्णय
- मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याची काँग्रेस-राष्ट्रवादीने पायाभरणी केली – घाटगे
- ‘माझ्याकडे नवरा आहे…’; ट्विंकलने युजरला दिले गमतीशीर उत्तर
- ‘मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला नाही, राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा’


