जालना: सध्या संपूर्ण राज्यभरात शेतकऱ्यांच्या कृषि पंपाचे कनेक्शन तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, मात्र याची कुठलीही पूर्वकल्पना शेतकऱ्यांना देण्यात आल नव्हती. मागील एक वर्षात एकही रुपायचं विकासकाम न करणारे हे सरकार वांझोटे असून आता शेतकऱ्यांच्या कृषि पंपाचे कनेक्शन तोडण्याचे काम करत आहेत, असा घणाघात करून शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असे माजी मंत्री आ. बबनराव लोणीकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.
जिल्ह्यातील नेर येथे आयोजित लाक्षणिक उपोषण प्रसंगी आ. लोणीकर बोलत होते. विद्यमान महावीकस आघाडी सरकारवर हल्लाबोल करत या सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांवर अन्याय आणि अत्याचार सुरू केला आहे, ही बाब महाराष्ट्राच्या उज्वल इतिहासाला कालिमा फासणारी आहे, वसूली करणे क्रमप्राप्त नक्कीच आहे परंतु त्यासाठी हा पर्याय होऊ शकत नाही असे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मत आहे. शेती पंपाचे कनेक्शन तोंडल्यास शेतकरी उद्ध्वस्त होईल, असे मत त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
यावेळी बोलताना त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या कार्याची आठवण करून दिली. जालना व परतूर येथे २२० केव्ही, नेर येथे १३२ केव्ही यासह जिल्हाभरात ४९-३३ केव्ही मंजूर केल्या होत्या. परंतु हे वांझोटे सरकार कोणत्याही प्रकारचे विकासकाम करत नाही, असा आरोप त्यांनी केला. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात आज १४९१० रुग्ण कोरोनामुक्त, तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘बाळासाहेब असते तर विमानतळाला नाव नाकारले असते!’, भुजबळांचा शिवसेनेला सल्ला
- ‘मी लठ्ठ असले तरीही…’, आपल्या लठ्ठपणावर बोलली विद्या बालन
- श्रीलंका दौऱ्यावर जाण्याआधी खेळाडूंना राहावं लागणार ‘इतके’ दिवस ‘क्वारंटाइन’
- आरक्षणावर नक्षल्यांची भूमिका जाहीर, ‘मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा!’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

