मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी ५ वाजता जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लसीकरणाबाबत महत्वाच्या घोषणा केल्या. २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस मोफत देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यासोबतच, लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार घेत असल्याचे सांगितले.
दरम्यान, अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा असून संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरण वेगाने होण्याची आवश्यकता आहे. मात्र, नागरिक उत्साही असताना लसींचा मुबलक साठा नसल्याने हिरमोड होत आहे. यावरून तीव्र नाराजी होत असून विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. यासोबतच, सर्वोच्च न्यायालयानेही केंद्र सरकारला लसीकरणाच्या धोरणावरून सुनावलं होतं.
मोदींच्या आजच्या संबोधनावर देखील विरोधकांनी टीकास्त्र सोडलं आहे. दुसऱ्या लाटेत ६२४ डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती IMA ने दिली आहे. यावरूनच काँग्रेसने ‘मोदीजी भाषण नको, माफी मागा’ अशी मागणी केली आहे. ‘तज्ञ सांगत असतानाही मोदी सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे कानाडोळा केला, लाखोंच्या सभा घेतल्या. परिणामी रुग्ण वाढले. या रुग्णांची सेवा करता करता कित्येक डॉक्टरांचे बळी गेले. याला सर्वस्वी जबाबदार मोदी सरकार आहे!,’ अशी टीका काँग्रेसने केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- संभाजीराजेंच्या डोक्यात राजकारण नाही, ते समजदारवृत्तीने आंदोलन करतील – थोरात
- …म्हणून मोदींनी लसीकरणाच्या जबाबदारीची घोषणा केली; नवाब मलिकांचा दावा
- ‘सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन जनतेने केल्याने कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येतेय’
- ‘आमच्यावर कारवाई केली, मग ‘त्या; प्रकरणावरून मुख्यमंत्री ठाकरेंवरही गुन्हा दाखल करावा’
- BREAKING: पुण्यात सॅनिटायझर तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग, ११ जणांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

