🕒 1 min read
नवी दिल्ली : कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत होताना दिसत असल्याने आता काही सवलती राज्य सरकार कडून दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियंत्रण प्रतिबंधांबाबतच्या निर्बंधांत कोणतीही सवलत न देण्याबाबतच्या सूचना राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. कोविड प्रतिबंधांच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन सर्वांनी सक्तीनं केलं पाहिजे असं देखील केंद्र सरकारने म्हटले आहे.
कोरोना संक्रमित विभाग आणि पाच टक्क्यांहून अधिक कोरोना संक्रमण असलेल्या जिल्ह्यांतील लोकांना मोठ्या संख्येनं एकत्र येण्याबाबत परवानगी देऊ नये. राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांनी याबाबत काळजी घेणे आवश्यक असून त्याबाबतचे दिशानिर्देश जारी करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. ज्या समारंभांत मोठ्या संख्येनं एकत्र यायला अगोदरच परवानगी दिली आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई करण्याबाबतचे निर्देशही केंद्र सरकारनं दिले आहेत.
दरम्यान, राज्यात काल दिवसभरात 1 हजार 410 नवीन कोरोनाबाधित आढळले तर या आजारातून काल 1 हजार 520 रुग्ण बरे झाले. त्यामुळे राज्यातील आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 64 लाख 35 हजार 439 झाली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97 पूर्णांक 46 शतांश टक्क्यांवर स्थिर आहे. कोविड-१९ मुळं काल राज्यात 18 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातला मृत्यू दरही 2 पूर्णांक 12 शतांश टक्क्यांवर स्थिर आहे. राज्यात सध्या 23 हजार 894 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रात कालही सर्वाधिक म्हणजे 400 कोरोना नवबाधितांची नोंद झाली.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यातील हत्या झालेल्या कबड्डीपटू मुलीच्या कुटुंबियांचे चंद्रकांत पाटलांकडून सांत्वन
- भारतात द्वेष पसरवणारी माहिती हाताळण्यात फेसबुक असमर्थ
- केंद्र सरकारच्या सुडबुद्धीला पुरून उरणार- दिलीप वळसे पाटील
- मनपा निवडणुकीची तयारी; एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर
- पुण्यातील महाविद्यालयात लसीकरणाला सुरुवात


