अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी सरकारच्या आदेशानुसार १७ मार्चला शिर्डीचे श्री साईबाबा समाधी मंदिर साई भक्तांसाठी बंद करण्यात आले होते. तब्बल आठ महिन्यानंतर हे मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. मात्र दर्शनासाठी गर्दी होऊ नये, यासाठी दर्शनाच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे. काल रविवार असल्यामुळे शिर्डी येथे दर्शनासाठी साई भक्तांची गर्दी झाली होती.
त्यामुळे कोणत्याही प्रकारची दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग न करता शिर्डीत येणाऱ्या भक्तांची गैरसोय होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा ही धोका आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कुठलेही नियोजन न करता शिर्डीत येऊ नका, असे आवाहनच संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी केले आहे.
लॉकडाऊन नंतर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले. दर्शन सुलभ व सुखद व्हावे, यासाठी भक्तांना ऑनलाइन व मंदिर परिसरात काउंटरवर पासेस उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु दर्शनासाठी घालून देण्यात आलेल्या मर्यादेपेक्षा जास्त साईभक्त हे शिर्डीमध्ये आता येऊ लागले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर कुठलेही नियोजन न करता शिर्डीत येऊच नका, असे आवाहन संस्थानने केले आहे.
संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे म्हणाले की, साईभक्तांना विनंती आहे की त्यांनी दर्शनाची वेळ व तारीख निश्चित न करता शिर्डीत दर्शनासाठी येऊ नये. जर दर्शनाची वेळ व तारीख निश्चित न करता ते शिर्डीत दर्शनासाठी आले तर त्यांची गैरसोय होईल, तसेच गर्दीही वाढेल. गर्दी वाढल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन दुसरी लाट येऊन विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कुठलेही नियोजन न करता शिर्डीत येऊ नये.
महत्वाच्या बातम्या
- ‘चंद्रकांत पाटील डोक्यावर परिणाम झाल्यासारखे खुळ्यासारखं बडबडत आहेत’
- IND vs AUS : पहिल्या कसोटी सामन्यात रोहित-इशांत खेळणार का? अजूनही संभ्रम कायम
- भाजपने बिहारमध्ये ‘लव्ह जिहाद’बाबत कायदा आणावा मग आम्ही बोलू : संजय राऊत
- ‘चंपा’चे ‘ते’ वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे,अजितदादांचा पलटवार
- जोपर्यंत दानवेंचा पराभव करत नाही तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही – अब्दुल सत्तार


