औरंगाबाद : कोरोना महामारीच्या काळात सर्व डॉक्टर्स, इतर वैद्यकीय कर्मचारी सतत कार्यरत आहेत. मागे वळून पाहताना या कठिण काळात आपले ज्ञान, कौशल्य यांचा वापर लोकांच्या भल्यासाठी, सेवेसाठी करता आला याचेच समाधान वाटते. या काळात उपचारांची, उपाययोजनांची दिशा ठरवतांना प्रत्येक दिवशी नवीनच संकट उभे राहत होते. मात्र या सर्वांमधून आपण बाहेर आलो याचा सर्वाधिक आनंद आहे. मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर बोलत होत्या. डॉक्टर्स डे निमित्त महाराष्ट्र देशाने त्यांच्याशी विशेष संवाद साधला.
माझ्या वैद्यकीय कार्यकाळात एवढ्या वर्षांमध्ये पहिल्यांदाच मी असा काळ पाहिला. ज्यात रोग नवीन होता, उपचार, निदान, तपासण्या सर्वकाही नवीन होते. त्यामुळे आलेल्या संकटावर मात करत हळूहळू रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर दिलासा मिळत होता. दरम्यानच्या काळात कोविड सेंटरमध्ये एका महिलेसोबत डॉक्टरने वाईट वागण्याचा प्रयत्न केला. सर्व काही समजून घेत या प्रकारणात खोलाशी जाण्याचा प्रयत्न केला होता.
हे प्रकरण खूप वाढले. त्यावेळी फार मनस्ताप सहन करावा लागला. मात्र आमच्या कर्तव्यात आम्ही कधीही चुकलो नाही, कमी पडलो नाही. कोरोनाने आपल्या भरपूर काही शिकवले आहे. यात आपला आहार कसा असावा, जीवनशैली कशी असावी हे सर्व अधोरेखित झाले. आता एकच अपेक्षा आहे ते म्हणजे या काळातून प्रत्येकाने एक धडा घ्यावा. आणि मास्कचा वापर, स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग, योग्य आहार, व्यायाम, उत्तम आरोग्य याकडे लक्ष द्यावे. कारण जीवन हेच सर्वात मौल्यवान आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ बँकांमध्ये पैसे जमा करण्यास येऊ शकतात अडचणी; जाणून घ्या नवे नियम
- ‘राजकीय उद्देशातून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले’, नवाब मलिकांची टीका
- लसीकरण केंद्रावर जाणून परिस्थितीचा आढावा घेण्यास मोदी आपल्या सहकाऱ्यांना का सांगत आहेत ?
- रोहित शर्माने लोणावळ्यातील बंगला विकला अशोक सराफांच्या कुटुंबीयांना ; किंमत तब्बल ५.२५ कोटी
- ‘बातमीत राहायचे असेल शरद पवारांबद्दल खालच्या पातळीत बोला!’, आव्हाडांनी सांगितला उपाय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

