Share

‘हिम्मत असेल तर विधानसभा विसर्जित करा’

Published On: 

मुंबई: सध्या मुंबईत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीत राज्यातील महावीकस आघाडी सरकारवर चांगलीच टीका केली जात आहे. भाजप पक्षाचा रोख ठाकरे सरकारवर असल्याचे दिसत आहे. देवेंद्र फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्रीच राज्याला हवा, असं विधान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी सी. टी. रवी यांनी केलं. त्याच सोबत त्यांनी विधानसभा विसर्जित करून पुन्हा निवडणूक लढवा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

महाराष्ट्राच्या विकासाचे काम होत नाही. राज्यातील जनतेने नरेंद्र आणि देवेंद्रच्या नावाने मतदान केलं होतं. सत्तेतच यायचं असेल तर विधानसभा विसर्जित करून निवडणुकीला सामोरे जा, आमचं तुम्हाला खुलं आव्हान आहे, असं म्हणत सी. टी. रवी यांनी थेट ठाकरे सरकारवर निशाण साधला आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत जनतेने भाजपला जास्त मतदान केलं आहे. पण शिवसेनेने लोकांचा कौल झुगारला आणि सत्तेत येण्यासाठी महावीकस आघाडी सरकार स्थापन केली.

शिवसेनेनी २०१९ च्या निवडणुकांच्या वेळी भाजपच्या नावाने मत गोळा केले आणि शेवटी लोकांनी दिलेला कौल नाकारत सत्ता स्थापन केली. त्यांनी केवळ भाजपला धोका दिला नाही तर जनतेला धोका दिला आहे. संधीसाधूंच्या सोबत जाऊन सरकार स्थापन केलं आहे. हा मतदारांचा अपमान आहे, अशी टीका त्यांनी केली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!