Share

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धुडकावत, भर रस्त्यावर भरला बाजार!

Published On: 

जालना : जिल्हात कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता जिल्हाधिकारीनी संपूर्ण जिल्ह्यात आठवडी बाजार भरण्यास बंदी आणलेली असताना सुद्धा केदारखेडा येथे भर रस्त्यावर बाजार भरवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला कैऱ्यांची टोपली दाखवण्याचे काम केले आहे. या संपूर्ण घटनेमुळे प्रशासनाला कोणी जुमानत नाही का असा प्रश्न उपस्थित होतो.

केदारखेडा ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार केवळ फोटोसेशन पुरताच सुरु आहे की काय, अशी शंका आता येवू लागली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिलेले असताना प्रत्यक्षात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचे काम सुरु आहे.

गुरुवारी केदारखेडा येथील आठवडी बाजाराला परवानगी देण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाकडुन केल्या गेले. बाजारात दुकाने थाटलेली होती, विना माक्स मालाची विक्री सुरू होती, शिवाय लग्न कार्यास परवानगी नसताना देखील केदारखेडा येथे आठ दिवसापूर्वी शेकडो च्या उपस्थितीत कोरोनाच्या उपाययोजना न पाळता विवाहसोहळे पार पडले. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाकडुन कानाडोळा केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!