Share

निराश कर्णधार रोहितने मधल्या फळीवर फोडले पराभवाचे खापर

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा ९ गडी राखुन दणदणीत पराभव केला. सलग तीन पराभव स्विकारल्यानंतर पंजाबने हा विजय मिळवला आहे. तर मुंबईचा हा सलग दुसरा तर स्पर्धेतील तिसरा पराभव ठरला आहे. शानदार अर्धशतकासाठी पंजाब संघाचा कर्णधार के एल राहुल याला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकात केवळ १३१ धावांचा पल्ला गाठला. यात कर्णधार रोहित आणि सुर्यकुमार यादव यांनी ७९ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. या दोघाव्यतिरीक्त मुंबईचा सलामीवीर डिकॉक(३), इशान किशन(६), पोलार्ड(१६), हार्दिक(१) आणि कृणाल(३) हे फलंदाज अपयशी ठरले. सामन्यानंतर या पराभवाला मधल्या फळीतील फलंदाज जबाबदार आसल्याचा ठपका रोहितने ठेवला. रोहित म्हणाला ‘ही खेळपट्टी फलंदाजीसाठी वाईट नाही, पंजाबच्या संघाने फलंदाजी करुन ते सिद्ध करुन दाखवले. आमचा संघ या सामन्यात जास्त धाव करण्यात अपयशी ठरला.’ असे तो म्हणाला.

या खेळपट्टीवर १५०-१६० धावा विजयासाठी पुरेशा आहेत. मात्र मागील दोन्ही सामन्यात मुंबई ही धावसंख्या उभी करण्यास असमर्थ राहिली. तसेच या सामन्यात मुंबईच्या फलंदाजानी पॉवरप्लेमध्ये केवळ २१ धावा केल्या तर डीकॉकचा बळी गमावला. मागील सामन्यात पॉवरप्लेमध्ये मुंबईची फलंदाजी चांगली झाली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!