Share

खंडणीखोर वसुली सरकारने एकाधिकारशाही सुरू केली का? राहुल लोणीकरांचा सवाल

Published On: 

जालना : भाजप नेते गोपचंद पडळकर यांच्या गाडीवर युवकाने हल्ला केल्याची घटना घडलीय. सोलापूर जिल्ह्यातील या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या घटनेवर भाजप युवा मोर्चाचे राज्य संघटन महामंत्री राहुल लोणीकर यांनी टीका केलीय. या घटनेमुळे महाराष्ट्रातील वसुली सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपवत असल्याचा आरोप राहुल लोणीकर यांनी केला आहे. इतकेच नाही तर या भ्याड हल्ल्याचा निषेधही त्यांनी व्यक्त केलाय.

या संदर्भात राहुल लोणीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारचा समाचार घेतला. ते म्हणाले की, ‘महाराष्ट्रात खंडणीखोर वसुली सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपून एकाधिकारशाही सुरू केली का? आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर भ्याड हल्ल्याचा भाजप युवा मोर्चा जाहीर निषेध करते! विचारांची लढाई विचाराने लढावी, दगडाने नाही.’

पडळकर यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या युवकाने हल्ल्याच्या वेळी शरद पवार यांच्या नावाने घोषणाबाजी केली होती. या आधी पडळकर यांनी शरद पवारांवर थेट आरोप केले आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर राष्ट्रवादीने हल्ला केल्याचा आरोपही पडळकर यांनी केला आहे. मात्र, आपण अशा हल्ल्यांना घाबरत नसल्याचेही पडळकर यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!