मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी सकाळच्या शपथविधीवरुन केलेल्या वक्तव्यावर चांगल्याच प्रतिक्रीया उमटल्या आहेत. त्यातच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रीया चर्चेत राहिली. त्यावर आता भाजप नेते नीलेश राणे यांनी टीका केलीय. मुळामध्ये संजय राऊत यांना अजित पवारांना चोर ठरवायचे होते का? असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केलाय.
या संबंधी नीलेश राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खोचक प्रश्न करत खासदार राऊत यांच्यावर टीका केलीय. ते म्हणाले की, ‘संज्याने कधीच कोणाची वकिली करू नये. अजित पवारांची वकिली करायला गेला आणि त्यांच्या इज्जतीचा कचरा केला. अजित पवारांनी शपथविधीच्या समर्थनार्थ पत्र चोरलं पण टॉर्च मारला कोणी, हा प्रश्न विचारला मुळात संज्याला अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?? दुसर, म्हणे अजित पवार चिरीमिरी खात नाही.’
विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अचानक पहाटे शपथ विधी उरकला होता. त्या नंतर घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर मात्र, दोघांनाही राजीनामा द्यावा लागला. ती आमची चूक होती, अशी कबुलीच देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे आता हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट
- ‘हसीन दिलरुबा’ चित्रपटाचा टीझर रिलीज, सोशल मीडियावर व्हायरल
- मोदींनी उशीरा घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना जीव गमवावा लागला; ममता बॅनर्जींची टीका
- मोदींच्या भेटीपूर्वी पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; दोघांमध्ये झाली तासभर चर्चा
- …म्हणून ‘त्या’ सात बहिणींवर आली वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची दुर्दैवी वेळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

