🕒 1 min read
मुंबई : आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आज देशभरात विविध राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भाजपचे नेते आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच राज्यातील सरकार समाजात सकारात्मक परिवर्तन करणाऱ्या योजना राबवेल, असे आश्वासन दिले.
“आपला स्वातंत्र्यदिन चिरायू होवो, अशी प्रार्थना करतो. पंतप्रधान मोदींनी सांगितल्याप्रमाणे आता आपला अमृत काळ सुरु झाला आहे. त्यामुळे आपल्याला पुढच्या २५ वर्षाचा विचार करून बलशाली भारत तयार करायचा आहे. सर्वसमावेशक विकास करायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार सर्वांना सोबत घेऊन एक मजबूत, बलशाली आणि विकसित महाराष्ट्र तयार करेल. दीन दलित, आदिवासी, शेतकरी, शेत मजूर, ओबीसी, महिला आणि बारा बलुतेदार अशा सर्वांच्याच आयुष्यात सकारात्मक बदल घडवणाऱ्या योजना हे सरकार राबवेल, असा विश्वास व्यक्त करतो.
महत्वाच्या बातम्या:
- Ajit Pawar। ‘कुवत नसलेली लोकं सत्तेत बसत असतील तर..’; अजित पवारांचं मोदींना प्रत्युत्तर
- Sonia Gandhi on Independence Day | “स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला तुच्छ लेखण्याचं काम सुरु”; सोनिया गांधींची भाजपवर जोरदार टीका
- Prakash Ambedkar। ‘हर घर तिरंगा’ हा राष्ट्रीय कार्यक्रम नसून…; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल
- Independence Day | परिवारवाद देशासाठी धोकादायक आहे, त्याचे शुद्धीकरण आवश्यक आहे – पंतप्रधान मोदी
- Independence Day | “गांधींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी स्वत:ला समर्पित केले” ; लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे संबोधन


