Share

उत्पल पर्रीकरांनी अपक्ष निवडणूक लढवल्याबद्दल फडणवीसांनी व्यक्त केली खंत; म्हणाले…

Published On: 

मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांमध्ये चांगलीच चढाओढ बघायला मिळत आहे. असे असतांनाच उत्पल पर्रीकर यांच्या भूमिकेविषयी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, एका मुलाखतीत बोलत असतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी उत्पल पर्रीकर(Utpal Parrikar) यांच्याविषयी भाष्य केले आहे.

यावेळी बोलत असतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,‘पर्रीकर कुटुंबासोबत आमचे भावनिक नाते असून उत्पल पर्रीकरने जेव्हा निवडणूक लढण्याची इच्छा दाखवली, तेव्हा आम्ही त्याला तीन पर्याय दिले. फक्त इतकेच नाही तर आत्ता तू निवडून ये, पाच वर्षांनी तुला पुन्हा पणजीमधून तिकीट देऊ. तरी त्यानी ऐकलं नाही’, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘मनोहर पर्रीकर हे संघटनेने निर्णय घेतला की ऐकायचे. आमची अपेक्षा तीच होती की उत्पलनेही पक्षाला वेठीला न धरता पक्ष जर आपल्या भल्याचा विचार करतोय, तर ते ऐकायला हवं होते. ते त्यानं ऐकलं नाही याचं आम्हाला दु:ख आहे’, अशी खंतही फडणवीसांनी बोलून दाखवली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!