🕒 1 min read
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सकाळी 11 वाजता लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केले. केंद्रीय अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या असून विरोधकांनी मात्र या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. विरोधक टीका करत असतानाच भाजप नेत्यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जनतेला संबोधित करून अर्थसंकल्पावर समाधान व्यक्त केलं आहे. सुरुवातीला मोदींनी सीतारामन यांचे आभार देखील मानले आहेत. तर, ‘असे चांगले अर्थसंकल्प कमीच पाहायला मिळतात,’ असे कौतुकाचे उद्गार देखील त्यांनी काढले. ‘या बजेटच्या हृदयात गाव आणि शेतकऱ्यांचा विकास आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांचा विकास व्हावा म्हणून कृषी क्षेत्रात चांगली तरतूद केली आहे. शेतकऱ्यांना यापुढं अधिक सोप्या पद्धतीनं कर्ज मिळू शकणार आहे. एपीएमसी मार्केटना आणखी बळकटी देण्यासाठीच्या तरतुदी करणयात आल्या आहेत.’ असं मोदी म्हणाले आहेत.
तर, ‘यंदाचा अर्थसंकल्प हा अडचणीच्या काळामध्ये सादर करण्यात आला आहे. कोरोना काळात जगभरात जे परिणाम पाहायला मिळाले त्यामुळं संपूर्ण मानव प्रजातीलाच हादरा बसला. त्यामुळं या काळात सादर करण्यात आलेला हा अर्थसंकल्प देशाता आत्मविश्वास वाढवणारा आहे.’ असं भाष्य देखील त्यांनी केलं.
महत्वाच्या बातम्या
- हा अर्थसंकल्प काही राज्यांमधील निवडणुका जिंकण्यासाठी- बाळासाहेब थोरात
- ‘सर्वाधिक टॅक्स, रोजगार आणि स्थैर्य देणाऱ्या महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसणारा हा अर्थसंकल्प’
- …म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचं अभिनंदन करण्याची हिंमत फडणवीसांचीही झाली नाही – अजित पवार
- ‘मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन हातात कागद न घेता अर्थसंकल्प विषयावर ३० मिनिटे बोलावं’
- #Budget2021 : ‘खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा’ संजय राऊतांचा सरकारला टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
