🕒 1 min read
मुंबई : गेल्या आठवड्यात पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीचा घराच्या बाल्कनीमधून पडुन मृत्यू झाला होता. या मुलीचे काही कॉल रेकॉर्डींग माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावरुन पूजाने महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांच्या दबावातून जीवन संपवल्याचा संशय भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.
यामुळे राज्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या प्रकरणात भाजपकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन तक्रार करण्यात आली आहे.
पूजाचा मृत्यू होऊन आठवडा उलटला आहे. मात्र, अद्याप संजय राठोड यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. एवढेच काय तर राज्याच्या दोन्ही गृहराज्यमंत्र्यांनी याबाबत प्रतिक्रियाही दिलेली नाही. दरम्यान, यावरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.
हे तर……महा गा य ब सरकार
मंत्रालयातून मुख्यमंत्री गायब
पूजा प्रकरणातील मंत्री गायब
राज्यातून दोन्ही गृहराज्यमंत्री गायब
प्रत्यक्ष घटना बघणारे दोन्ही साक्षीदार गायब
विकास कमी भकास जास्त
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा…..@CMOMaharashtra @BJP4Maharashtra— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 15, 2021
‘हे तर……महा गा य ब सरकार. मंत्रालयातून मुख्यमंत्री गायब. पूजा प्रकरणातील मंत्री गायब. राज्यातून दोन्ही गृहराज्यमंत्री गायब. प्रत्यक्ष घटना बघणारे दोन्ही साक्षीदार गायब. विकास कमी भकास जास्त. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’, असे ट्वीट करत चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण गूढ मृत्यू प्रकरणावरून सरकारवर प्रहार केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ToolKit प्रकरणातील निकिता जेकब आणि शांतनु कोण? काय होता त्यांचा प्लॅन? जाणून घ्या…
- कोरोना योद्ध्यांचा सन्मान फक्त दिखाव्यासाठी ! प्रत्यक्षात मात्र उपेक्षाच
- चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देऊ नका, गडकरींनी टोचले स्वपक्षातील लोकप्रतिनिधींचे कान
- ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात दिशानंतर आता निकिता जेकब विरोधात अटक वॉरंट
- पूजा चव्हाण प्रकरणी आवाज उठवणाऱ्या ‘या’ भाजप आमदाराला येताहेत धमकीचे फोन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
