Share

नाणेफेक हरल्यावरही कर्णधार कोहली होता आनंदी, सांगितले ‘हे’ कारण

Published On: 

पुणे : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडच्या संघाचा ६६ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक गमावली होती. मात्र नाणेफेक गमावल्यानंतरही कर्णधार कोहली हा आनंदी दिसत होता. मात्र तो का आनंदी होता यामागील कारण कोहलीने उशीरा स्पष्ट केले.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक गमावली होती. इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र नाणेफेक हरल्यानंतरही कोहली आनंदी होता. कारण कोहलीने ठरवले होते जर नाणेफेक जिंकलो तर प्रथम फलंदाजी करायची. तसेही आमची गोलंदाजी सक्षम आहे लक्ष्याचा बचाव करण्यासाठी टी-२० मालिकेत याची प्रचिती आलेली आहेच. तेव्हा प्रथम फलंदाजी करताना कोणतीही अडचण येणार नाही. हे कोहलीला ठाऊक होते.

याबद्दल बोलताना कोहली म्हणाला की, ‘याच मैदानावर इंग्लंडने दिलेल्या ३५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला होता. त्या सामन्यात केदार जाधवने १२० धावांची दमदार खेळी साकारली होती. मात्र त्या सामन्यात मैदान हे प्रेक्षकांनी भरलेले होते. आज मात्र मैदानात एकही प्रेक्षक नाहीए’ असे तो म्हणाला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!