मुंबई: मागील काही दिवसांपासून होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर त्रस्त आहेत. रस्त्यांवरील खड्यांच्या समस्येमुळे नागरिकांना दीड-दोन तास कोंडीत अडकुन राहावे लागत आहे. यावरून ठाण्याला मुख्यमंत्रीच काय, पंतप्रधानपद जरी दिले तरी येथील समस्या कायम राहतील, असा संताप मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे. यावरूनच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी टीका केली आहे.
“ज्यांची हयात रस्त्यावर सभा घेऊन वाहतुकीचा जनतेला त्रास देण्यात गेली ते मनसे नेते ठाण्यातील वाहतुक कोंडी बाबत मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांचे सल्ले देतात, त्याच आदरणीय शिंदे साहेबांच्या पायावर नाक रगडुन मनसे मंत्री पद मागत आहे. जाधवराव महामंडळासाठी हात जोडुन रांगेत दिसले.”, असा टोला दिपाली सय्यद यांनी लगावला आहे.
ज्यांची हयात रस्त्यावर सभा घेऊन वाहतुकीचा जनतेला त्रास देण्यात गेली ते मनचे नेते ठाण्यातील वाहतुक कोंडी बाबत मुख्यमंत्र्यांना पंतप्रधानांचे सल्ले देतात, त्याच आदरणीय शिंदे साहेबांच्या पायावर नाक रगडुन मनचे मंत्री पद मागत आहे. जाधवराव महामंडळासाठी हात जोडुन रांगेत दिसाल!
— Deepali Sayed (@deepalisayed) July 10, 2022
दरम्यान ठाणे आणि मुंबईच्या दिशेने वाहनांची ये-जा सुरू असल्याने छेडानगर जंक्शनला वाहनांना मोठ्या कोंडीला सामोरे जावे लागते. ही कोंडी सोडविण्यासाठी एमएमआरडीएने २०१८ मध्ये छेडानगर सुधारणा प्रकल्प हाती घेतला असून त्यासाठी तीन उड्डाणपूल आणि एका अंडरपासची उभारणी करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : कायदेशीररित्या आमची बाजू भक्कम, आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे – संजय राऊत
- Sanjay Raut | राज्यात बेकायदेशीर सरकार प्रस्थपित करण्याचा प्रयत्न – संजय राऊत
- ENG vs IND : विराट कोहलीच्या खराब फॉर्मबाबत रोहित शर्मा म्हणतो, ‘‘तो लवकरच…”
- Arvind Sawant : “न्यायाला उशीर करणं हे सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला अपेक्षित नाही”; कोर्टाच्या निर्णयावर अरविंद सावंत नाराज
- “नागपूरमधून काही शहरापर्यंत 140 किलोमीटर ताशी वेगाने मेट्रो धावणार”; नितीन गडकरी यांची मोठी घोषणा


