Share

‘भारताला ‘हिंदू राष्ट्र’ घोषित करा नाहीतर मी जलसमाधी घेईन’

Published On: 

अयोध्या – भारताला हिंदुराष्ट्र घोषित करण्याची मागणी हिंदुत्ववादी नेहमीच करत असतात. तशी ही मागणी जुनी आहे मात्र आता ही मागणी पुन्हा एकदा करण्यात आल्याने या मागणीची सध्या जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. जगदगुरु परमहंस आचार्य महाराज यांनी मंगळवारी त्यांनी अयोध्येमध्ये भारताला गांधी जंयतीपर्यंत हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करावं अशी मागणी केलीय. तसेच केंद्र सरकारने असं केलं नाही तर आपण जलसमाधी घेऊ असंही महाराजांनी म्हटलं आहे.

जगदगुरु परमहंस आचार्य महाराजांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही मागणी केलीय. “माझी मागणी आहे की २ ऑक्टोबरपर्यंत भारताला ‘हिंदू राष्ट्र’ म्हणून घोषित करावं, नाहीतर मी शरयू नदीमध्ये जलसमाधी घेईल. तसेच केंद्र सरकारने मुस्लीम आणि ख्रिश्चन लोकांचं नागरिकत्व काढून घ्यावं,” असं जगदगुरु परमहंस आचार्य महाराज यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या मागणीमुळे आणि सरकारला दिलेल्या इशाऱ्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काहींनी जगदगुरु परमहंस आचार्य महाराज यांच्यावर टीका केली आहे तर काहींनी या मागणीला विरोध दर्शविला आहे. सध्या सोशल मिडीयावर या बाबत मोठ्याप्रमाणात चर्चा होताना दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!