मुंबई : गेल्यावर्षी पासून कोरोना रोगाने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला आहे. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्र अग्रस्थानी असून कोरोना मृतांचा आकडा देखील अधिक आहे.
मार्च महिन्याच्या अखेरीस संपूर्ण राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. यानंतर, विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यास सुरुवात झाली होती. मात्र, कोरोना नियमांचे न होणारे योग्य पालन आणि वाढती रुग्णसंख्या यामुळे संपूर्ण राज्यात पुन्हा तिसऱ्या स्तराचे नियम लावण्यात आले होते. आता पुन्हा एकदा राज्यात अनलॉकला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून लोकल ट्रेनबाबत काय निर्णय होणार? याची उत्सुकता सर्वसामान्य मुंबईकरांना लागलेली आहे. दरम्यान सध्या मिळालेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यांपासून निर्बंधात असलेलं महाराष्ट्र राज्य टप्प्याटप्याने अनलॉक होणार असल्याचं बोललं जात आहे. कोणकोणते निर्बंध कशा पद्धतीने हटवून सवलती देण्यासंदर्भातील अहवाल टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा निर्णय मात्र लगेच घेतला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
रेल्वे प्रवासी संघटना आणि सामान्य नागरिकांकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, राज्य सरकार सावध भूमिका घेत तुर्तास तरी सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल ट्रेन सुरू करणार असल्याचं बोललं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अंगणही त्यांचंच आणि महाभारतही तिकडचंच; त्यांनीच कौरव कोण, पांडव कोण हे ठरवावं’
- हाताच्या पंजाने ‘वाघ’ पुन्हा गारद; शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
- ‘पांडवांकडे सत्तेची क्षमता होती, मात्र…’; पंकजा मुंडेंच्या महाभारतातील कौरव नेमके कोण ?
- ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता…’ ; ‘त्या’ बैठकीत मोदींनी घेतली भाजप नेत्यांची शाळा
- ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा’


