Share

“वडिलांना धुणी-भांडी करण्याची भीती वाटतेय आणि चिरंजीव…”, भातखळकरांचे टीकास्त्र

Published On: 

मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी एक मोठे वक्तव्य केले असून मुंबईचे महत्व कमी करुन सगळं काही दिल्लीला नेण्याचा डाव सुरु आहे. मात्र २०२४ साली आपण सर्व दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारचं असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याच मुद्द्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘वडिलांना धुणी-भांडी करण्याची भीती वाटतेय आणि चिरंजीवाला दिल्लीची स्वप्न पडतायत. महाराष्ट्रात यांचे ५६ आमदार आहेत’, असा खोचक टोला भातखळकरांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.

दरम्यान, इतर पक्ष नाटकं करतात पण आपण परखडपणे बोलतो. मराठीचे काय होणार याची आजच्या दिवशी चिंता करत बसण्यापेक्षा आजचा दिवस साजरा करुया. मराठी भाषा दिल्लीच्या तख्तापुढे कधीही झुकली नाही आणि आजही ही मराठी दिल्लीपुढे झुकणार नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!