मुंबई : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी एक मोठे वक्तव्य केले असून मुंबईचे महत्व कमी करुन सगळं काही दिल्लीला नेण्याचा डाव सुरु आहे. मात्र २०२४ साली आपण सर्व दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारचं असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याच मुद्द्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘वडिलांना धुणी-भांडी करण्याची भीती वाटतेय आणि चिरंजीवाला दिल्लीची स्वप्न पडतायत. महाराष्ट्रात यांचे ५६ आमदार आहेत’, असा खोचक टोला भातखळकरांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.
वडिलांना धुणी-भांडी करण्याची भीती वाटतेय, चिरंजीव दिल्लीची स्वप्न पडतायत. महाराष्ट्रात यांचे ५६ आमदार आहेत. https://t.co/mD9D3O1uUE
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 27, 2022
दरम्यान, इतर पक्ष नाटकं करतात पण आपण परखडपणे बोलतो. मराठीचे काय होणार याची आजच्या दिवशी चिंता करत बसण्यापेक्षा आजचा दिवस साजरा करुया. मराठी भाषा दिल्लीच्या तख्तापुढे कधीही झुकली नाही आणि आजही ही मराठी दिल्लीपुढे झुकणार नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :
- “राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे”, उदयनराजेंचा इशारा
- छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही- सुप्रिया सुळे
- कुलदीप आणि सिराजने केली अंपायरची नक्कल ; व्हिडीओ होतोय व्हायरल
- राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
- “आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर…”, रोहित पवारांचा इशारा


