मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलेलं दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली. यानंतर राज्यभरात आंदोलनं सुरु झाले आहेत. तर भाजप नेत्यांसह मराठा क्रांती मोर्चा समन्वयक देखील आक्रमक झाले आहेत.
मुंबईमध्ये कोरोना आटोक्यात आल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाने कालपासून अचानक जमावबंदी लावली आहे. असं असलं तरी इतर व्यवहार व इतर गोष्टी सुरूच आहेत. त्यामुळे कोरोनाचे कारण देत हि जमावबंदी जागू करण्यात आली आहे की मराठा समाजाची आक्रमकता बघता मुंबईत संभाव्य आंदोलन टाळण्यास करण्यात आलेली युक्ती? असा सवाल भाजप नेत्यांनी केला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी या जमावबंदीवरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ‘ मराठा आरक्षणाचा आवाज व आंदोलन दाबण्यासाठी मुंबईत ही जमावबंदी लावण्यात आली आहे’ असा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही बंदी करण्यात आली आहे कि कोरोना रोखण्यासाठी? यावर आता स्पष्टीकरण मागितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या :
- #Breaking_News : मंत्री बच्चु कडू यांना कोरोनाची लागण
- #मराठा_आरक्षण : खासदार संभाजीराजेंनी टीकाकारांना दिलं खरमरीत प्रत्युत्तर
- माजी आमदार सरदार तारासिंग यांचे निधन
- ‘नशीब आता मी जेल बाहेर आहे’ ; छगन भुजबळांना आठवलं कारागृह
- अहमदनगरची कोरोना स्थिती हाताळण्यासाठी आलेले मुश्रीफ, दुसऱ्या दिवशी स्वतः कोरोना बाधित झाले!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

