Share

मराठा आंदोलन रोखण्यासाठीच मुंबईमध्ये जमावबंदी ; चंद्रकांत पाटलांचा आरोप

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलेलं दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली. यानंतर राज्यभरात आंदोलनं सुरु झाले आहेत. तर भाजप नेत्यांसह मराठा क्रांती मोर्चा समन्वयक देखील आक्रमक झाले आहेत.

मुंबईमध्ये कोरोना आटोक्यात आल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाने कालपासून अचानक जमावबंदी लावली आहे. असं असलं तरी इतर व्यवहार व इतर गोष्टी सुरूच आहेत. त्यामुळे कोरोनाचे कारण देत हि जमावबंदी जागू करण्यात आली आहे की मराठा समाजाची आक्रमकता बघता मुंबईत संभाव्य आंदोलन टाळण्यास करण्यात आलेली युक्ती? असा सवाल भाजप नेत्यांनी केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी या जमावबंदीवरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ‘ मराठा आरक्षणाचा आवाज व आंदोलन दाबण्यासाठी मुंबईत ही जमावबंदी लावण्यात आली आहे’ असा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही बंदी करण्यात आली आहे कि कोरोना रोखण्यासाठी? यावर आता स्पष्टीकरण मागितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!