मुंबई : शेतकऱ्यांना हिरव्या चाऱ्याची सोय करताना अनेक समस्या उद्भवत असतात. पाण्याची उपलब्धता असेल तर शेतकऱ्यांना हिरव्या चाऱ्याची व्यवस्था सहज करता येऊ शकते. ऐन उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची कमतरता निर्माण झाली तर त्याचा परिणाम दुधावर झालेला दिसून येतो. द्विधल असणारा चवळीचा चारा जनावरांसाठी फायद्याचा आहे. यासह शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढही होऊ शकते.
या चाऱ्याची वारंवार कापणी करुनही पुन्हा चारा म्हणून उपयोग करता येऊ शकतो. चवळी चारा अधिक पौष्टिक आणि पचण्या जोगे आहे. त्यामुळे जनावरांची दूध उत्पादन क्षमता वाढते. याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामुळे शेतीची खत क्षमता देखील वाढते, ज्यामुळे शेतकऱ्यांना पुढील पिकात फायदा घेता येतो. चवळीमुळे तणांचा नाश करून जमिनीची सुपीकताही वाढते.
चवळी लागवडीसाठी आवश्यक गोष्टी –
द्विदल चवळीची लागवड करण्यासाठी निचरा होणारी शेतजमिन निवडा. केवळ एका जागी पाणी साचून राहिल अशी जमिन नसायला पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांनी शेती निवडण्यासाठी फार विचार करण्याची गरज भासणार नाही. शेती तयार करण्यासाठी चांगली नांगरणी आवश्यक करा. त्यामुळे उगवण तर चांगली होतेच शिवाय उत्पादनाच्या दृष्टीने उत्तम आहे. शेतकऱ्यांना चवळीची शेती करायची असेल तर हाच काळ त्यांच्यासाठी खूप चांगला आहे. ते मार्चच्या अखेरीस चवळीची लागवड करता येते. श्वेता, बुंदेल चवळी-2 आणि बुंदेल लोबिया-3 या चवळी वाणाची लागवड संपूर्ण भारतात लागवड करता येते.
महत्वाच्या बातम्या –


