जालना : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असणाऱ्या भाजपा सरकारने समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. विविध विकासकामांसाठी सर्वाधिक निधी मिळाला. पण आता महाराष्ट्रात विकास करणारे नाही तर केवळ वसुली करणारे सरकार आहे, अशी टीका माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली.
मंठा तालुक्यातील केंधळी, केदारवाकडी, पेवा व ढोकसाळ या गावांना जोडणाऱ्या डांबरीकरणाच्या रस्त्याचे उदघाटन आ. लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विकासकामांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले. ‘फडणवीस सरकारच्या काळात आ. लोणीकर यांनी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे पाठपुरावा करून रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळवली’ असा दावा त्यांनी केला.
मागील पंचवार्षिकमध्ये आपल्या मंत्रिपदाच्या काळात आपण परतूर विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी विविध माध्यमातून निधी आणला. सध्याचे राज्य सरकार प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारवर ढकलण्याचा प्रयत्न करत असून स्वतः मात्र काहीही करत नाही. मागील पाच वर्षात सुरळीत झालेली घडी पुन्हा विस्कटून टाकण्याचे आणि विकासाऐवजी केवळ वसुली करण्याचे काम वर्तमान राज्य सरकार करीत असल्याची टीका लोणीकर यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- पंकजा मुंडेंनी समर्थकांना समजावले, पण त्यांनी दिलेल्या राजीनाम्यांचे काय झाले?
- एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या; जावई गिरीश चौधरी यांच्या कोठडीत १९ जुलैपर्यंत वाढ
- डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला हायकोर्टाचा दिलासा, घेतला ‘हा’ निर्णय
- ‘मुंबई विमानतळावर ‘आवाज’ हा मराठी माणसाचाच असेल’, मनसेचा इशारा
- योगींच्या राज्यात कावड यात्रेला परवानगी; सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारकडे स्पष्टीकरण मागितले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
