Share

राज्यात आणखी कडक निर्बंध करण्याचा आरोग्यमंत्र्यांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. 2 दिवसांत रुग्णांमध्ये दुप्पट वाढ झाली. लोकांकडून नियमांचं पालन केलं जात नसल्याने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लागू करण्याची शक्यता राजेश टोपे यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत 2 दिवसांत चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली आहे. आपल्याकडे जर सहजासहजी गोष्टी घेतल्या तर याची किमंत संख्यात्मक वाढ होऊन चुकवावी लागेल. राज्यात निर्बंध आणखी कडक केले जाऊ शकतात, असा इशारा राजेश टोपे यांनी दिला आहे. लसीकरणातही आपण थोडे मागे असून ते योग्य नाही सांगत त्यांनी ही टक्केवारी वाढवण्यासाठी आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

100 टक्के लसीकरणाचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला. राज्यात कोरोनाची वाढणारी रुग्णसंख्या हा धोक्याचा अलार्म आहे. दोन दिवसांमध्ये रुग्णांची दुप्पट वाढ झाली आहे. त्यात मुंबईचा पॉझिटिव्हीची रेट हा चार टक्क्यांवर गेला आहे. ही परिस्थिती चिंता निर्माण करणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कडक निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, टास्क फोर्स आणि मंत्रिमंडळ याबाबत निर्णय घेईल, असे राजेश टोपे म्हणाले आहेत.

मत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!