Share

‘कोर्टाने ठाकरे सरकारची पळवाट बंद केली, सीबीआय लवकरच मंत्रालयाची पायरी चढणार’; भाजपचा टोला

Published On: 

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या तसेच नियुक्त्यांच्या सीबीआय चौकशीला विरोध करण्यासंदर्भातील महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली आहे. आता यावरूनच भाजपने ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे.

सीबीआयने देशमुख यांच्याविरोधात जो गुन्हा दाखल केला आहे, त्यात बदल्या, नियुक्त्या तसेच एका अधिकाऱ्याला  पुन्हा सेवेत घेण्याबाबतचे दोन परिच्छेद आहेत. हे परिच्छेद वगळले जावेत, असे राज्य सरकारने याचिकेत नमूद केले होते. दरम्यान ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. यावरूनच ताशेरे खाल्ले, तिखट बोल ऐकले आणि आता थोबाड रंगायचं बाकी आहे. असे म्हणत पोलिस बदल्यातील भ्रष्टाचारविरुद्ध सीबीआयने दाखल केलेला FIR रद्द करण्यास नकार देऊन सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकारची पळवाट बंद केली आहे. सीबीआय लवकरच मंत्रालयाची पायरी चढणार. अशा आशयाचे ट्विट मुंबई भाजपने केले आहे.

https://twitter.com/BJP4Mumbai/status/1428236557094244355

दरम्यान या निर्णयामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीकडून पाचवे समन्स बजावूनही अनिल देशमुख चौकशीसाठी उपस्थित राहू शकले नाही. यावरूनही ठाकरे सरकारवर भाजपने सडकून टीका केली आहे. तर आता पोलिस  अधिकाऱ्यांच्या  बदल्या तसेच नियुक्त्यांच्या सीबीआय चौकशीला विरोध करण्यासंदर्भातील निर्णयामुळे ठाकरे सरकारवर निशाना साधत भाजपने टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!