पुणे : यावर्षी कापसाला चांगला दर मिळाला. पण सध्या कापूस दर स्थिरावले आहेत. युध्दजन्य परस्थितीमुळे कापसाचे दर थांबले आहेत असे बोलले जात आहे. विश्व युध्द होण्याच्या भीतीने मधल्या काळात कापसाचे दर मोठ्या प्रमाणात घसरले होते.
रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युध्द सुरु होताच कापूस दर घसरले. सध्या दर स्थिरावले आहेत त्यामुळे भविष्यात कापसाचे दर वाढणार आहेत. हे कापूस उत्पादकांना माहित असणे गरजेचे आहे. या परिस्थितीत कापूस उत्पादकांनी कोणता निर्णय घ्यावा असा प्रश्न कापूस उत्पादकाला पडत आहे.
जानेवारी महिन्यामध्ये कापसाला ११ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. पण सध्या हा 8 ते 10 हजारांवर दर स्थिरावले आहेत. त्यामुळे कापसाची साठवणूक करावी? का विक्री? हे प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहेत. युध्द थांबल्यानंतर पुन्हा बाजारपेठेतले दर सुधारतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या कापूस साठवणूक करून योग्य वेळ साधून कापूस विक्री करणे शेतकऱ्यांना फायद्याचे ठरेल. कांदा उत्पादक जसे निर्णय घेतात अगदी तसेच कापूस उत्पादकांना निर्णय घ्यावा लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

