🕒 1 min read
औरंगाबाद : इंधन दरवाढीमुळे जर तुम्ही इलेक्ट्रिक वाहन वापरत असाल तर तुमच्यासाठी खुषखबर आहे. औरंगाबाद मनपाने शहरात १० नवीन वाहन चार्जिंग स्टेशन उभे करणार आहे. आणि सुरुवातीला तीन महिने या चार्जिंग स्टेशनवर मोफत चार्जिंग सेवा देणार असल्याची माहितीही मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितली आहे.
दोन-तीन वर्षापुर्वी औरंगाबाद शहरात कचऱ्याचा प्रश्न चांगलाच पेटला होता. पण हा प्रश्न काही प्रमाणावर सुटला असे म्हणता येईल. गल्लोगल्ली कचऱ्याच्या गाड्या या दिसत आहेत. जमा केलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया ही सुरु झाली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मनपाने पर्यावरणाच्या दृष्टीने शहरात सायकल ट्रक सुरू केले आहेत. सोबतच शहरात रस्त्याचे कामही जोरात सुरु आहे. यात भर म्हणुन प्रदुषणाला आळा बसावा म्हणून इलेक्ट्रिक वाहनाचा वापर वाढावा यासाठी शहरात १० वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
मोठ्या शहरांप्रमाणेच औरंगाबाद शहरातही इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्राथमिक स्तरावर १० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभे करणार असल्याचे मनपाने सांगितले आहे. या संदर्भात टाटा मोटर्स व टाटा पॉवर या कंपनीसोबत महानगरपालिकेची चर्चा केली असल्याचे मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिली आहे. या स्टेशनवर सुरुवातिचे तीन महिने चार्जिंग मोफत दिली जाणार असल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले आहे. इंधन दरवाढी च्या पार्श्वभुमीवर शहरवासीयांसाठी ही आंनदाची बाब आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्यासह देशात काळा दिवस पाळण्यासारख्या अनेक घटना घडल्या त्यावेळी भाजप चूप बसला’
- “तुम्ही माझी मागील १०-१५ सामन्यांतील कामगिरी बघा” ; रहाणेच सडेतोड उत्तर
- भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली; दोघांचा मृत्यू
- ‘राज्यपाल स्वतःच्याच कासोट्यात पाय गुंतून सारखे का पडत आहेत?’
- भारत आणि इंग्लंड संघात आज होणार काट्याची टक्कर ; भारतीय संघ तगड्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
