मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.
राज्यात आज ८ हजार ६२३ कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. तर, काल पेक्षा आज कमी रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसांभारात ३ हजार ६४८ कोरोना बाधित रुग्ण हे बरे झाले आहेत. दरम्यान, एकूण २० लाख २० हजार ९५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या काही दिवसांमध्ये रोज आठ हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचे वाढते संक्रमण हे आता केंद्र सरकारचीही चिंता वाढवत आहे. त्यामुळे तिथल्या कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी आता केंद्र सरकारनं धडपड सुरू केली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाला आवरण्यासाठी केंद्रानं उच्चस्तरीय समिती तयार केली आहे. ही समिती राज्यातील कोरोना नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी सरकार प्रयत्न करते – सुभाष देसाई
- सावधान! ‘या’ रुग्णांची माहिती लपवल्यास होणार २ वर्षांचा कारावास
- आरोग्य विभागात गुणवत्तेलाच प्राधान्य ; आरोग्यमंत्र्यांनी दिला परीक्षार्थींनी धीर
- खाम स्वच्छता मोहीम,नव्या ‘स्मार्ट’ सीईओंची अनुपस्थिती
- जालन्यात कोरोनामुळे चौघांचा मृत्यू; १७१ नव्या बाधित रुग्णांची नोंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
