नवी दिल्ली : सध्या भारतात कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. अशातच, भरमसाठ होत असलेल्या रुग्णवाढीमुळे भारतातील आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. देशातील परिस्थिती भीषण बनत चालली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंतिम संस्कार करण्यासाठी जागा देखील मिळत नसल्याचे चित्र आहे.
दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांत दैनंदिन पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत आणि होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या एका आठवड्यात दिल्लीमध्ये 65,180 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दरम्यान, राष्ट्रीय राजधानी 4 मेपासून प्रति दिन 300 हून अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. एका दिवसात सर्वाधिक मृत्यू 3 मेरोजी झाले होते. त्यावेळी शहरात 448 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता.
कोरोनाच्या या वाढत्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये लॉकडाऊन एक आठवड्यासाठी वाढवण्यात आला आहे. राजधानीत आता 24 मे रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या दरम्यान, निर्बंध शिथील करण्यात आलेले नसून निर्बंध कायम असणार आहेत. अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
दरम्यान, भारतात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. दररोज तीन लाखांहून अधिक नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. दैनंदिन मृतांचा आकडाही चार हजारांवर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 311,170 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 3,62,437 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला’, पंकजा मुंडेंच्या भावना
- औरंगाबादेत म्युकरमायकोसिसने घेतला ‘एवढ्या’ रुग्णांचा बळी!
- मराठा समाजाच्या युवकांकडून मराठा आमदार-खासदारांचे पिंडदान
- मोठी बातमी : अरबी समुद्रामधील चक्रीवादळ रत्नागिरीच्या दिशेने, रेड अलर्ट जारी
- दुखापतीमुळे आर्चर त्रस्त, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका खेळण्याबाबतचे शंका


