औरंगाबाद : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडून संदर्भातील चर्चेला आता पूर्ण विराम लागला आहे. प्रशासनाच्या वतीने ११ तारखे पासून अंशतः लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. निर्णय चांगला आहे परंतु, प्रशासन कडक वागेल तरच कोरोना आटोक्यात येईल असे आ.अतुल सावे यांनी महाराष्ट्र देशाशी बोलतांना सांगितले.
प्रशासनाने शनिवार, रविवार लॉकडाऊन संदर्भात घेतलेला निर्णय चागंला आहे. इतर दिवशी केलेल्या अंशतः लॉकडाऊन मुळे रोजगार बंद होणार नाही. उद्योग, व्यापार चालू राहिला तर त्याने एकदम लोकांना ताण येणार नाही. वेळेची मर्यादा देखील पुरेसी आहे, त्यामुळे जास्त गर्दी होण्याची शक्यता कमी आहे.
यावरही लोकांनी गर्दी करून अथवा रुग्ण संख्या वाढतच राहिल्यास प्रशासन कडक लॉकडाऊन करणार असले तरी, अंशतः लॉकडाऊन देखील त्यांनी कडक पणे राबविले पाहिजे, त्यामुळेच रुग्ण संख्या आटोक्यात येणार आहे. तसेच नागरिकांनीही सामाजिक अंतर, मास्क यांसारख्या बाबी जपल्या पाहिजे असे आमदार अतुल सावे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- व्यापाऱ्याच्या घरावर दरोडा, चाकूचा धाक दाखवत पावणेचार लाखांचा मुद्देमाल लंपास
- जिल्हा परिषद सदस्याच्या वाढदिवसाला कोरोना नियमांचा चुराडा
- शिवसेना नेत्याचे राज ठाकरेंना आव्हान, हिंमत असेल तर नाणारवासियांसमोर भूमिका मांडावी
- ..म्हणून मला अंबानी-अदाणीबद्दल सहानुभूती, पंतप्रधान मोदींचा खुलासा
- कार्यालय झाले सुंदर पण अंगणातील नाल्याचे काय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

