🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याचा अखेरचा दिवस आहे. गेले तीन दिवस भाजपने राज्य सरकारवर विविध विषयांवरून हल्लाबोल केला आहे.
काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना काळातील भ्रष्टाचारावरून राज्य सरकारवर आरोप केले होते. ‘WHO ने कौतुक केल्यानंतर राज्य सरकारने स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेतली मात्र देशातील 34 टक्के मृत्यू राज्यात झाले आहे. देशातले 46 टक्के रुग्ण राज्यात आहे. कोरानाबाबत काय चाललंय काही कळत नाही. रुग्ण संख्या खरंच वाढली की अजून काही आहे हे कळत नाही. अमरावतीत लोकांना विचारलं जातंय की अहवाल पॉझिटिव्ह हवाय की निगेटिव्ह ? कोणी मंत्री, अधिकारी जातात आणि लॉकडाऊन करतात. छोट्या व्यापाऱ्यांना काही मदत करणार आहात का? अमरावतीत लॉकडाऊन का केलाय?’ असे सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत.
फडणवीसांच्या या सवालांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. ‘राज्यात कोरोनाचा संस्ग्र पुन्हा वाढतोय. कोरोना व्हायरस म्हणतोय, “मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन” ‘ असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. पुढे ते म्हणाले, ‘राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा हा अधिक आहे, कारण त्यात कोणतीही लपवाछपवी नाही. सर्व रुग्णांचे आकडे हे पारदर्शक आहे. मी आयुष्यात कधीच खोटं बोललेलो नाही,’ असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- संजय राठोडांचा राजीनामा गेला कुठे ? राष्ट्रवादीने दाखवलं CMO कडे बोट !
- ‘तो दिवस दूर नाही…जेव्हा मोदीजी बाहेरून स्टेशन बघायचे देखील पैसे घेतील’
- जगभरातील फलंदाजांची दाणादाण उडवणारा ‘हा’ खेळाडू अडकणार विवाहबंधनात
- दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणारा गजाआड
- महिला न्यायाधीशाला मध्यरात्री वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे वकिलाला पडले महागात; थेट तुरुंगात झाली रवानगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
