Share

आता कोरोना चाचणीने होणार शहरात येणाऱ्यांचे ‘स्वागत’

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी आता महापालिकने शहराच्या सहा एन्ट्री पॉइंटवर पुन्हा कोरोना चाचण्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीचे नियोजन सध्या सुरु आहे. आगामी दोन दिवसात एन्ट्री पॉइंटवर आरोग्य विभागाची पथक तैनात करून कोरोना चाचण्या सुरु केल्या जाणार आहेत.

औरंगाबादेत गतवर्षी जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्यावेळी रूग्णसंख्या अधिकच वाढू लागल्याने बाहेर गावाहून औरंगाबाद शहरात येणार्‍यांच्या तपासणीसाठी पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शहराच्या सहा एन्ट्री पॉइंटवर कोरोना चाचण्यांसाठी पथके तैनात केली होती.

चिकलठाणा येथील केंब्रीज शाळा, हर्सूल-सावंगी येथील टोल नाका, दौलताबाद टी पॉइंट, नक्षत्रवाडी, झाल्टा फाटा या पाच ठिकाणी कोरोना चाचणीसाठी पथकांची नियुक्ती केली होती. बाहेर गावाहून येणार्‍यांची या पॉइंटवर चाचणी केली जात होती. चाचणी निगेटिव्ह आली तरच शहरात प्रवेश दिला जायचा.

या एन्ट्री पॉइंटवरील चाचण्यांमुळे सुमारे चाळीस हजारावर नागरिक करोनाबाधित होण्यापासून वाचले, असा दावा केला गेला. आता पुन्हा शहरात बाधितांची संख्या वाढते आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे शहराच्या एन्ट्री पॉइंटवर कोरोना चाचणी करण्याचे नियोजन केले जात आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी शुक्रवारी दिली.

येथील चाचण्यांतून पॉझिटिव्ह निघालेल्यांना तेथूनच कोविड केअर सेंटर किंवा खासगी दवाखान्यात पाठवण्यात येईल. त्यामुळे काही प्रमाणात संसर्गाला ब्रेक लागण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!