मुंबई : नव्या कोरोना रुग्णांचा राज्यातील वाढता आकडा पाहता आता याचा ताण आरोग्य यंत्रणांवर येऊ लागला आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स आणि इतर आरोग्य सुविधाही अपुऱ्या पडू लागल्या आहेत. राज्यातील अनेक शहरांत बेड्सची संख्या अपुरी पडू लागले आहेत.
राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय वापरासाठी ८० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे निर्देश आरोग्य विभागने दिले आहेत. तर उर्वरित २० टक्के ऑक्सिजन पुरवठा हा औद्योगिक वापरासाठी असणार आहे. नुकतंच आरोग्य विभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. येत्या ३० जूनपर्यंत राज्यात हे आदेश लागू असणार आहे.
राज्यात कोरोना रुग्णांना उपचारासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर गरज भासत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता वैद्यकीय कारणासाठी ऑक्सिजनचे उत्पादन अनेक पटीने वाढविण्याचे निर्देश उत्पादकांना देण्यात आले आहेत. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्याकरीता राज्यातील ऑक्सिजन उत्पादन केंद्रांच्या माध्यमातून होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
‘राज्यात दररोज ३५ ते ४० हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असेल तर तशी वैद्यकीय व्यवस्था आहे का, हे पाहावं लागेल. परिस्थिती अशीच राहिली तर लॉकडाऊनसारखा पर्याय वापरावा लागेल,’ असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याआधी व्यक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ते’ हस्ताक्षर मोदींच नाहीच ! काँग्रेस नेत्याने व्हिडीओ शेअर करून केली पोलखोल
- ‘बारामतीत डिपॉजिट जप्त झालं, ध्यानीमनी नसताना दादांनी आणि फडणवीसांनी आमदार केलं, आता…’
- राणा दाम्पत्याच्या फोटोला चपलांचा हार; होळीचा अवमान केल्याने शिवसेनेचा संताप
- ‘वाझेबाबत ‘तो’ निर्णय शिवसेनेचाच होता, तर राऊतांनी सुद्धा त्यांच्या कृत्याबाबत इशारा दिला होता’
- सत्तांतराला कोणताच मुहूर्त नसतो; चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने खळबळ


