मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी व शनिवारी बांगलादेशच्या दौऱ्यावर गेले होते. कोरोना काळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच विदेश दौरा होता. बांगलादेशच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आणि बंगबंधू शेख मुजबीर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी त्यांना बोलावण्यात आलं होतं.
या दौऱ्यावेळी मोदींनी केलेल्या भाषणासोबतच हिंदू मंदिराला दिलेली भेट, पश्चिम बंगालसह आसाम निवडणुकांची पार्श्वभूमी यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यासोबतच, ढाक्यापासून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या सावर येथे शहिदांच्या राष्ट्रीय स्मारक येथील नोंदवहीमधील लिहिलेल्या संदेशाचा फोटोही चांगलाच व्हायरल होत आहे. मोदींनी भेट दिल्यानंतर येथील नोंदवहीमध्ये संदेश लिहिला आहे. मोदींच्या हस्ताक्षराची वाह वाह केली जात आहे.
मात्र, या नोंदवहीतील हस्ताक्षरावर एका काँग्रेस नेत्याने आक्षेप घेतला आहे. भाजप महाराष्ट्र तर्फे मोदींनी नोंदवहीमध्ये लिहिलेल्या संदेशाचा फोटो शेअर करण्यात आला होता. काँग्रेसमधील अनुसुचित जाती विभागातील प्रदेश कार्यकारी अध्यक्ष असणाऱ्या डॉ. जितेंद्र देहाडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साबरमती आश्रमाच्या भेटीचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.
विशेष म्हणजे, या व्हिडीओमध्ये नोंदवहीमध्ये आधीच लिहून ठेवलेल्या संदेशावर मोदी स्वाक्षरी करताना दिसत आहेत. ‘माननीय पंतप्रधान हे नेहमीच आधीच लिहिलेल्या संदेशावर स्वाक्षरी करतात. यावर कधी कोणीही आक्षेप घेतला नाही मग हा सुंदर हस्ताक्षराचा खटाटोप कशासाठी. मा.पंतप्रधान यांनी साबरमती आश्रम मधील भेटीत अभ्यागत पुस्तकामधे आधीच लिहिलेल्या संदेशावर स्वाक्षरी केली होती,’ अशी टीका केली आहे.
@ChDadaPatil दादा, आपल्या पक्षाच्या सोशल मिडिया टीम ची कीव येते.
एवढा खोटेपणा कशासाठी…
— Dr. Jitendra Dehade (@jitendradehade) March 28, 2021
यासोबतच, त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांना देखील सवाल केला आहे. ‘चंद्रकांत दादा, आपल्या पक्षाच्या सोशल मिडिया टीम ची कीव येते. एवढा खोटेपणा कशासाठी…’ असा टोला देखील डॉ. जितेंद्र देहाडे यांनी लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- फडणवीस उमेदवार मागे घेतील? ३ तारखेपर्यंत वाट बघा :जयंत पाटलांच मोठ वक्तव्य
- ‘बारामतीत डिपॉजिट जप्त झालं, ध्यानीमनी नसताना दादांनी आणि फडणवीसांनी आमदार केलं, आता…’
- राणा दाम्पत्याच्या फोटोला चपलांचा हार; होळीचा अवमान केल्याने शिवसेनेचा संताप
- ‘वाझेबाबत ‘तो’ निर्णय शिवसेनेचाच होता, तर राऊतांनी सुद्धा त्यांच्या कृत्याबाबत इशारा दिला होता’
- सत्तांतराला कोणताच मुहूर्त नसतो; चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने खळबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

